Wednesday, 20 May 2020

मुंबईत क्वारंटाईन सेंटर मध्ये ‘कोरोना का कमिशन’
ठाकरे सरकारचा शेकडो कोटींचा घोटाळा
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांचा आरोप

 पवित्र समय न्यूज़(मुंबई)२०/०५/२०२०

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मुंबईतील क्वारंटाईन सेंटर्सची कंत्राटे मिळवण्यासाठी स्पर्धा लागली असून यामध्ये कंत्राटदार मालामाल होत असले तरी कोरोनाग्रस्त रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. क्वारंटाईन सेंटर्सशी संबंधित कंत्रांटांमध्ये शेकडो कोटींचा घोटाळा होत आहेअसा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमैया यांनी बुधवारी केला.

ते म्हणाले कीविविध क्वारंटाईन सेंटरमध्ये कंत्राटदारांना वेगवेगळे दर आकारण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना दोन वेळचे जेवणचहानाष्ट्यासाठी कंत्राट दिले असले तरी यासाठी आकराण्यात आलेले दर मात्र सारखे नाहीत. यात मुंबईच्या पूर्व उपनगरात 172 रुपयेदादर धारावीसारख्या परिसरात 372 रुपयेअंधेरी जोगेश्र्वरीत 350 रुपये तर ठाण्यात 415 रुपये इतका दर आकारण्यात येत आहेत. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असले तरी त्या परिस्थितीतही खाबूगिरी चालू असल्याचे दिसते.

क्वारंटाईन सेंटरमधील जेवणाच्या वाईट दर्जामुळे कोरोना रुग्णांना त्रासाला तोंड द्यावे लागत असतानाच असतानाच कंत्राटदारांची कशी चलती सुरु आहे हे सुध्दा आता उघड झाले आहे. मुंबईतल्या क्वारंटाईन सेंटरमधील कंत्राटदारांबाबतचे एक धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची आपली मागणी असल्याचे मा. किरीट सोमैया म्हणाले.

No comments:

Post a Comment

मनीष नायर के अथक प्रयास से स्मशान भूमि का प्रस्ताव पास!

 मुंबई-पवई वार्ड क्रमांक 121 में आरोप-प्रत्यारोप के विवादों में चल रहे शिवसेना (शिंदे गुट)मनीष नायर और पूर्व नगरसेविका चंद्रावती मोरे के द्व...