Wednesday, 30 September 2020

पवित्र समय न्यूज़

 विलगीकरण केंद्रातील महिला सुरक्षेसाठीच्या SOP कधी जाहीर करणार :भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सवाल

 पवित्र समय न्यूज(मुंबई) ३०/०९/२०२०

विलगीकरण केंद्रातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मंत्रालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत झालेल्या वाढीची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले. असेच निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही देण्यात आले. 

श्रीमती चित्रा वाघ म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात  सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मार्च महिन्यापासुन राज्यातल्या विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र राज्य सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विलगीकरण केंद्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी SOP जाहीर करण्याची घोषणा या  सरकारच्याच ‘दिशा कायद्या’ च्या घोषणेसारखीच कागदोपत्री राहिली आहे.

विलगीकरण केंद्रामध्ये पुरूष आणि महिला रूग्णांना वेगवेगळे ठेवण्यात यावे, केंद्रातल्या रूग्णांची माहिती केंद्र प्रमुखांनी स्थानिक प्रशासनाला द्यावी, महिला विलगीकरण केंद्राला पोलिस सुरक्षा द्यावी , पोलिसांना पीपीई किट द्यावेत तसेच जर या केंद्रामध्ये अत्याचाराची घटना घडली तर आरोपीसह तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसही जबाबदार ठरवावे आदी मागण्या श्रीमती वाघ यांनी यावेळी निवेदनात  केल्या आहेत.

Monday, 28 September 2020

पवित्र समय न्यूज़

 शेतकरी संकटात रहावा अशीच दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

 पवित्र समय न्यूज़(मुंबई) २८/०९/२०२०

मोदी सरकारने  शेतकऱ्यांच्या हितासाठी आणलेला कायदा राज्यात लागू करणार नाही अशी भूमिका दोन्ही काँग्रेस कडून घेतली जात आहे.  शेतकरी कायम हवालदिल रहावा, संकटात रहावा अशी दोन्ही काँग्रेसची इच्छा आहे का, असा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपा माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माध्यम विभागाच्या सह प्रभारी  देवयानी खानखोजे उपस्थित होते.

श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, कृषी क्षेत्राबाबत संसदेत नुकत्याच संमत झालेल्या विधेयकावरून काँग्रेसने राजकारण सुरु केले आहे. या कायद्याची अंमलबजावणी राज्यात होणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कडून मांडली गेली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने या कायद्याच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकले आहे. काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कोठेही विकता येईल अशा प्रकारची बंधनमुक्त व्यवस्था तयार करण्याचे आश्वासन दिले होते. कंत्राटी शेतीचा प्रारंभ महाराष्ट्र, हरियाणात काँग्रेस सत्तेत असतानाच झाला होता. आता केवळ विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेसने या विधेयकाला विरोध सुरु केला आहे. यावरून शेतकऱ्यांचे भले होऊ नये अशीच काँग्रेस- राष्ट्रवादीची इच्छा आहे, अशी शंका निर्माण होते आहे.

सत्तेत येण्यापूर्वी अवकाळी पावसाने झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार तर बागायती शेतकऱ्यांना 50 हजार रु. मदत द्या अशी मागणी केली होती. मात्र सत्तेवर येताच उद्धव ठाकरे यांना आपल्या मागणीचे विस्मरण झाले आहे. अलीकडेच विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले पीक वाया गेलेले आहे. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला राज्य सरकारकडे पैसे नाहीत,  असे राज्य सरकारचे  मंत्री सांगतात. यावरूनच राज्य सरकार चालविणारे तिन्ही पक्ष शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काहीच करीत नाहीत हेच दिसून येते आहे,  असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.

या मुद्द्याचे राजकारण करू नये असे आवाहनही श्री. उपाध्ये यांनी केले.

 

Sunday, 27 September 2020

पवित्र समय न्यूज़ (मुंबई)

 *रफ़ीक़ नगर(गोवंडी) में चोरों का तांडव एक युवक की हत्या चार घायल*

पवित्र समय न्यूज़(मुंबई) २८/०९/२०२०

मुंबई-शिवाजी नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत रफ़ीक़ नगर (गोवंडी) में कोरोना महामारी से त्रस्त जनता अब चोरों के तांडव से परेशान हो रही तो कुछ तथाकथित मोबाईल चोरों ने धारदार हथियार से एक युवक की हत्या करके चार लोगों को घायल करके फरार हो गये। सूत्रों ने बताया कि रफ़ीक़ नगर शिवाजी नगर, गोवंडी में मादक पदार्थों के सेवन करने वाले मोबाईल चोरों का गिरोह लोगों की जान तक लेने लग गये है। ऐसा ही एक मामला तस्लीम नामक युवक जो उत्तर प्रदेश के पानीपत से दो महीने पहले मुंबई आया था और एक मटन की दुकान में 300 रुपये हर दिन की पगार पर काम करता था,शुक्रवार के दिन काम से घर आकर बाहर बैठकर मोबाईल चला रहा था उसी दरमियान नशेड़ी असमाजिक तत्वों ने मोबाईल छीनने का प्रयास किया तस्लीम ने जब उसका विरोध किया तो  मोबाईल चोरों ने तस्लीम कुरैशी को धारदार हथियार जैसे तलवार,चॉपर, सलिया से हमला कर दिया जिससे उसकी मौत हो गयी। जबकि बीच बचाव करने गये तस्लीम के मौसेरे भाईयों पर भी जानलेवा हमला किया गया। बताया जाता है कि अस्पताल में भर्ती एक युवक की हालात अभी भी नाजुक है। स्थानीय पत्रकार हयात खान के अनुसार  शिवाजी नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाली झोपड़पट्टियों में नशेड़ियों का गिरोह सक्रिय हैं, जो कोरोना महामारी के कारण लगे लॉक डाउन से स्थानीय जनता वैसे ही बेरोजगारी भुखमरी से परेशान चल रही ऐसे में नशेड़ी चोरों के तांडव से पूरा क्षेत्र भयभीत हो गया और जिस प्रकार बीच सड़क पर हत्या करके और चार लोगों को घायल किया जाता है यह कानून व्यवस्था के ध्वस्त होने की दुहाई दे रहा है। जबकि रफ़ीक़ नगर की जनता और मृतक व घायल के परिवार वालों ने अपराधियों के खिलाफ खुलकर मोर्चा खोलते हुये पुलिस प्रशासन खासकर शिवाजी नगर पुलिस से तुरंत हत्यारे आरोपियों को गिरफ्तार करके कड़ी से कड़ी सजा देने की मांग की है।

Friday, 18 September 2020

पवित्र समय न्यूज़

 *भाजपा के कार्यसम्राट पूर्व विधायक सरदार तारा सिंह ने दुनिया को किया अलविदा*

पवित्र समय न्यूज़(मुंबई) १९/०९/२०२०


मुंबई-भाजपा के पूर्व विधायक सरदार तारा सिंह के निधन की कुछ दिनों से अफवाह फैलाई जा रही थी। लेकिन वो आज सच साबित हो गयी, आज सुबह मुंबई के लीलावती अस्पताल में अंतिम सांस ली बताया जाता है कि पिछले कई अर्से से सरदार बीमार चल रहे थे।और उनकी हालात गम्भीर बनी हुई थी। लेकिन अस्पताल में भर्ती होने के बाद उनके निधन की अफवाह फैल गयी जिससे उनके समर्थकों ने सोशल मीडिया पर श्रद्धांजलि देकर दुःख प्रकट किया लेकिन सरदार तारा सिंह आज सुबह दुनिया को अलविदा कर गये। जिससे मुलुंड, भांडुप, पवई खासकर झोपड़पट्टी बाहुल्य क्षेत्र  के नागरिकों के लिये मसीहा रहे जिन्होंने झोपड़पट्टीयों में जो काम नही होने वाला वो भी पूर्ण करवाया यही नही घरेलू आपसी मनमुटाव को छोड़ बाकि सभी समस्याओं को सुलझाने के लिये आम लोगों की तरह सड़कों पर और उनके कार्यालय के दरवाजे हमेशा खुले रखे वही कार्यसम्राट पूर्व विधायक सरदार तारा सिंह को खोने का मतलब विकास की गति थम जाना बताया और गहरा दुख जताया। उनके निधन की खबर से गहरा दुख जताने वालों में पवई वार्ड क्रमांक 121 के भाजपा उपाध्यक्ष सिरिल टावरों(अंकल) गौतम नगर पवई से रणजीत सिंह,रामधनी यादव, महेश पांचोली,देवीदास गायकवाड़,रुकमुदिन शेख, फ़ैयाज़ खान,ससेराव खंदारे,अनवर शेख,सतीश बनसोडे,समेत सैकड़ों नागरिकों ने भावुक होकर श्रद्धांजलि दी। वही पत्रकार सतीश गुप्ता,मुकेश पांचोली,हरेश गुजेटी और अन्य उनके करीबी रहे पत्रकारों ने एक कर्तव्यनिष्ठ और कार्यसम्राट पूर्व विधायक के चले जाने से मुलुंड, भांडुप व पवई के विकास की रफ्तार थमना बताया। उनके निधन से प्रदेश भाजपा मुख्यालय और भाजपा समर्थकों में शोक की लहर फैल गयी लोगों ने अपने चहेते और कार्यसम्राट पूर्व विधायक सरदार तारा सिंह को नम आंखों से श्रद्धांजलि दी।

पवित्र समय न्यूज

 नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळेच कोरोना आटोक्यात

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे प्रतिपादन


 पवित्र समय न्यूज़(मुंबई) १८/०९/२०२०

महात्मा गांधींप्रमाणे सामान्यातल्या सामान्य माणसाला विश्वासात घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळेच कोरोना सारख्या संकटावर आपण मात करू शकलो. असे नेतृत्व मिळणे हे देशाचे भाग्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शुक्रवारी केले. तर नरेंद्र  मोदी यांनी गरीब कल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली , असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले .  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल सभेला संबोधित करताना श्री. तोरसेकर, श्री. फडणवीस  बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,  राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , ज्येष्ठ नेते विनोद तावडे आदी मान्यवर या व्हर्च्युअल सभेला उपस्थित होते. 

श्री. तोरसेकर यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाचे , कार्यशैलीचे वेगवेगळे पदर उलगडून दाखविले.  ते म्हणाले की, मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना अभिप्रेत असलेले स्वयंसेवकत्व अंगी पूर्णपणे बाणवले आहे. पंतप्रधानपदासारख्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्यावरही मोदी यांनी आपल्यातला स्वयंसेवक , कार्यकर्ता जपलेला आहे. आपल्या संघटनेची विचारधारा अंमलात आणण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती , संयम मोदींकडे असल्याने 370 वे कलम रद्द करणे , तिहेरी तलाक रद्द करणे, रामजन्मभूमीवर मंदिर उभारणे या गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्या. आपल्या विचारांवर , आपल्या कृतीवर नितांत विश्वास असल्याने टीकाकारांकडे दुर्लक्ष करीत मोदी निर्धारपूर्वक वाटचाल करीत आहेत. 

गांधीवाद्यांनी महात्मा गांधी यांना कधी पूर्णपणे समजून घेतले नाही.  मात्र नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना पूर्णपणे समजून घेतले आहे. सामान्य माणसाला विश्वासात घेत महात्मा गांधींनी स्वराज्याचा लढा ज्या प्रमाणे व्यापक बनविला त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेला साद घालत लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यश मिळवले. त्यामुळेच आपण कोरोनाला अटकाव करू  शकलो. मोदी यांच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी त्यांना पूर्णपणे समजून घेतले पाहिजे, असेही श्री. तोरसेकर यांनी सांगितले.    

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांत देशाला बलशाली , विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा आढावा घेतला. मोदी यांनी दिल्लीतील भ्रष्ट व्यवस्था मोडीत काढत केंद्र सरकारच्या कारभारात कार्यक्षमतेची नवी व्यवस्था निर्माण केल्याचेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात  राज्यात भाजपातर्फे प्लाझ्मा दान, दिव्यांगांना अवयवदान , रक्तदान यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 

 आ.  अतुल भातखळकर यांनी सूत्रसंचालन केले.       

Wednesday, 16 September 2020

पवित्र समय न्यूज़

 *वरिष्ठ पत्रकार राजुकमार द्विवेदी के निधन से पत्रकारों ने भावुक होकर दी श्रद्धांजलि*

पवित्र समय न्यूज़ (मुंबई) १६/०९/२०२०

मुंबई-पूर्वी उपनगर के वरिष्ठ पत्रकार राजकुमार द्विवेदी का कल रात को निधन हो गया वे लंबे अर्से से बीमार चल रहे थे। उनके निधन से पत्रकारों और परिजनों में गहरा शोक व्याप्त हो गया है। ज्ञात हो कि राजकुमार द्विवेदी कुछ महीनों से बीमार चल रहे थे और हाल ही में बीमारी को मात देकर घर लौट आये लेकिन कल जीवन की जंग हार गये जिससे पूर्वी उपनगर के पत्रकारों ने भावुक होकर श्रद्धांजलि दी। राजुकमार द्विवेदी ने पत्रकारिता की शुरुआत यशोभूमि समाचार पत्र के जरिये की और इसके बाद दिव्य प्रभाकर,वालीबुड दुनिया जैसे समाचार पत्रों के भूतपूर्व संपादक के साथ-साथ हिंदुस्तान न्यूज़ एजेंसी,जागरूक टाइम्स तथा मुंबई महानगर, खबरें आजतक,नवभारत जैसे समाचार पत्रों से जुड़े रहे। यही नही अखिल भारतीय हिंदी पत्रकार संघ के राष्ट्रीय महासचिव के पद पर भी रहे और पत्रकारिता के क्षेत्र में पूर्वी उपनगर के अधिकतर पत्रकारों के प्रेरणाश्रोत रहे, लेकिन कल उनके निधन से पूर्वी उपनगर के पत्रकार मंडली में गहरा सदमा पहुँच गया। पत्रकार सुरेंद्र दुबे, प्रमोद कुमार, यशपाल शर्मा हरिश्चंद्र पाठक, कमल वर्मा, मेहबूब फारूकी,शमशाद खान,हरेश गुजेटी अजय सिंह, मुकेश पांचोली,गणेश जायसवाल,श्यामसुंदर श्रीवास्तव समेत उनके करीबी मित्रों ने भावुक होकर नम आंखों से श्रद्धांजलि दी। और भगवान से उनकी आत्मा की शांति के लिये प्रार्थना करते हुये इस दुख की घड़ी में उनके परिवार को दुख सहन करने की शक्ति दे ऐसी कामना की।

पवित्र समय न्यूज़

 पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरील चित्र प्रदर्शनाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

 पवित्र समय न्यूज़(मुंबई) १६/०९/२०२०

 लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी या चित्रप्रदर्शनाचे उद्घघाटन झाले. यावेळी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, ज्येष्ठ नेते विनोद तावडे, माजी आमदार मधू चव्हाण, माजी आमदार अतुल शहा, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि कार्यालय मंत्री मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपातर्फे सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान, प्लाझमा दान, स्वच्छता कार्यक्रम, पर्यावरणासंबंधी जागृती असे निरनिराळे उपक्रम या निमित्ताने राबवण्यात येत असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितले.

     पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा आजवरचा जीवनपट तसेच त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा घटनांची सचित्र माहिती या चित्र प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन उद्या गुरुवार दिनांक 17 सप्टें. ला दिवसभर भाजपाच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयात पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

 

Monday, 14 September 2020

पवित्र समय न्यूज़

 *महाराष्ट्र की शान पत्रकारों की आन अनिल गलगली के जन्मदिन पर ढेरों शुभकामना संदेश*

पवित्र समय न्यूज़ (मुंबई) १४/०९/२०२०


मुंबई-महाराष्ट्र की शान पत्रकारों की आन निष्पक्ष पत्रकारिता और आरटीआई के माध्यम से प्रशासन में बड़े बड़े भ्रष्टाचार की पोल खोलने वाले अनिल गलगली उनका आज 14 सितंबर को  जन्मदिन है, जिसमें उनके समर्थकों व चाहने वालों ने जन्मदिन की ढेरों शुभकामना व बधाई  संदेश सोशल मीडिया के माध्यम से दिया गया। ज्ञात हो कि इस वर्ष कोरोना महामारी के चलते सभी धार्मिक समाजिक और अन्य कार्यक्रम मनाने की परमिशन सरकार द्वारा नही दी गयी। लेकिन आज सोशल मीडिया के दौर में फेसबुक, ट्विटर ,इंस्टाग्राम, व्हाट्सएप पर शुभ चिंतको ने अपने अपने अंदाज में धार्मिक सामाजिक कार्यक्रम मनाते हुये कोरोना महामारी से जंग जारी रखी हुई है। लेकिन आज महाराष्ट्र मुंबई के ऐसे आरटीआई कार्यकर्ता व वरिष्ठ पत्रकार अनिल गलगली का जन्मदिन है जिन्होंने महाराष्ट्र ही नही पूरे देश में अपना नाम और काम का परचम लहराया है। जिससे भ्रष्टाचार पर लगाम लगी और भ्रष्टाचारी बेनकाब हुये ऐसे निष्पक्ष आरटीआई कार्यकर्ता व पत्रकार को जन्मदिन की शुभकामनाएं व बधाई देने वालों में मनोज यादव, अवधेश दुबे,बिन्नी दलवी,हरेश गुजेटी,सतीश गुप्ता,रघुराज तिवारी,मुकेश पांचोली,समेत सैकड़ो पत्रकारों व सामाजिक लोगों ने दीर्घायु होने की कामना की।

पवित्र समय न्यूज़

 घरगुती कामगार कल्याण मंडळाला 100 कोटी द्या- आ. अतुल भातखळकर यांची राज्य सरकार कडे मागणी


पवित्र समय न्यूज़ (मुंबई) १४/०९/२०२०


'घरगुती काम करणाऱ्या महिलांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते उद्घाटन'

कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या घरगुती काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी घरगुती कामगार कल्याण मंडळाला राज्यसरकाने तात्काळ १०० कोटी रुपयांची मदत करून राज्यात बंद असलेली घरगुती कामगारांची नोंदणी पुन्हा सुरु करावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.  

देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'सेवा सप्ताह' अभियानांतर्गत आ. अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने घरकाम करणाऱ्या महिलांना कोरोना नंतर उद्भवलेलेल्या परिस्थितीत अधिक नेटकेपणाने आणि जलदगतीने घरकाम करण्याचे एका आठवड्याचे मोफत ऑनलाइन प्रशिक्षण व पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन आज कांदिवली पूर्व विधानसभेचे आ.अतुल भातखळकर व जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोष केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत घरेलू काम करणाऱ्या महिलांना नव्या सुरुवातीसाठी सज्ज करण्याच्या हेतूने कांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने व प्रथम एज्युकेशन फौंडेशन यांच्या सहकार्याने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह, कांदिवली पूर्व येथे आठ दिवसांच्या मोफत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाची आज सुरुवात झाली. यात 140 महिलांनी सहभाग घेतला असून त्यांना कोरोनासह जगताना स्वत:च्या तसेच इतरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, चेहऱ्यावर कोणते मास्क असावे, त्याचा वापर कसा करावा, सॅनिटायझर नियमित कसे वापरावे, सुरक्षित अंतरावर राहून कामे कशी करावीत, कामे अधिक जलद गतीने कशी करावीत, इलेक्ट्रॉ निक उपकरणे कशी हाताळावी, संभाषण कौशल्य कसे असावे, घरात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करावे, आदी महत्वपूर्ण बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. संतोष केळकर यांच्या उपस्थितीत केवळ 4 % टक्के व्याजदरावर 10 हजार रुपये कर्ज वाटप कार्यक्रमाची सुद्धा सुरुवात करण्यात आली असून, या अंतर्गत आज 175 महिलांनी नोंदणी केली असून, त्यांना लवकरच कर्जाचे वाटप केले जाणार आहे.

Saturday, 12 September 2020

पवित्र समय न्यूज़

 निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तमाम जवानांची व महाराष्ट्राची माफी मागावी- आ. अतुल भातखळकर"

पवित्र समय न्यूज़ (मुंबई) १२/०९/२०२०

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखाविरोधात कारवाई करण्याचे नाटक ठाकरे सरकार कडून करण्यात आले होते. या विरोधात आ. अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींच्या विरोधात घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी कलम ४५२ हे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहे.


काल कांदिवली येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे त्यांच्या घरात घुसून शिवसेनेचा शाखाध्यक्ष कमलेश कदम व त्याच्या ८-१० साथीदारांनी जबर मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस मदन शर्मा यांनाच अटक करण्यास गेली होती.  या विरोधात कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी मारहाण केलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु राज्याला गुंडागर्दीचे राज्य बनवू पाहणाऱ्या ठाकरे सरकारच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी जामीनपात्र कलम लावून केवळ कारवाई करीत असल्याचे नाटक केले. काल रात्रीच सर्व आरोपींना पोलीस स्थानकातूनच जामीन मंजूर करून सोडून देण्यात आले. मारहाण झालेले मदन शर्मा हे इस्पितळात आहेत व आरोपी मोकाट सुटले आहे. स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशसेवा करणाऱ्या निवृत्त सैनिकाला शिवसेनेच्या गुंडाकडून ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली आहे हि बाब शरमेने मान खाली घालणारी असून शिवसेनेने व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तमाम जवानांची व महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी सुद्धा आ. भातखळकर यांनी केली आहे.      

एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला घरात घुसून शिवसैनिकांकडून एवढी जबर मारहाण केली जात असताना सुद्धा राज्याचे ठाकरे सरकार झोपेचे सोंग घेत असून, महाराष्ट्राला शिवसेनेच्या गुंडाचे राज्य बनविण्याचे काम केले जात आहे, सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना मारहाण केली जात आहे, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांच्या विरोधात सुडाचे राजकारण करण्याचे काम ठाकरे सरकारकडून केले जात आहे, सत्ता त्यांच्या डोक्यात गेली असून त्यांचा माज महाराष्ट्राची जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असल्याचे आ. भातखळकर म्हणाले.


पवित्र समय न्यूज़

 *मशहूर सिंगर अनुराधा पौडवाल के बेटे का हुआ निधन,किडनी की बीमारी से थे पीड़ित*

पवित्र समय न्यूज़ (मुंबई) १२/०९/२०२०


मुंबई-धार्मिक भजन गायिका व फ़िल्म जगत में बैकग्राउंड सिंगर अनुराधा पौडवाल के बेटे आदित्य पौडवाल का आज सुबह निधन हो गया है, 35 वर्षीय आदित्य पौडवाल किडनी की बीमारी से कुछ महीनों से पीड़ित थे। ज्ञात हो कि यह वर्ष फ़िल्म जगत के लिये बहुत ही दुखद चल रहा है फ़िल्म अभिनेता ऋषि कपूर इरफान खान ओर वाजिद अली जैसे बेहतरीन अभिनेताओं ने बीमारी के कारण अलविदा कर चुके तो बहुत अभिनेताओं ने अन्य किसी कारणों से हिम्मत हारकर मौत को गले लगा लिया उक्त सदमें से अभी तक राहत मिली नही की आज एक और खबर सामने आयी, फ़िल्म जगत की मशहूर बैकग्राउंड सिंगर रही और धार्मिक भजनों की गायिका अनुराधा पौडवाल के बेटे आदित्य पौडवाल के निधन से फिर फ़िल्म जगत में गम का माहौल बन गया। मीडिया रिपोर्ट के अनुसार 35 वर्षीय आदित्य पौडवाल पिछले कुछ महीनों से किडनी की बीमारी से पीड़ित रहे और किडनी की परेशानी के कारण अस्पताल में भर्ती थे। लेकिन आज सुबह किडनी फेल होने के कारण उनका निधन हो गया जिससे अनुराधा पौडवाल के साथ पूरा परिवार ओर उनके शुभ चिंतक गमगीन हो गये।

मनीष नायर के अथक प्रयास से स्मशान भूमि का प्रस्ताव पास!

 मुंबई-पवई वार्ड क्रमांक 121 में आरोप-प्रत्यारोप के विवादों में चल रहे शिवसेना (शिंदे गुट)मनीष नायर और पूर्व नगरसेविका चंद्रावती मोरे के द्व...